Saturday, 17 May 2025

पैठणीचा रुबाब! 


पैठणीचे वैशिष्ट्य म्हणजे चौकोनी तिरकस डिझाइनच्या कडा आणि मोराच्या डिझाइनसह पदर . साधे तसेच ठिपकेदार डिझाइन उपलब्ध आहेत. इतर प्रकारांमध्ये, एक रंगीत आणि  -रंगीत डिझाइन देखील लोकप्रिय आहेत. लांबीच्या दिशेने विणण्यासाठी एका रंगाचा आणि रुंदीच्या दिशेने विणण्यासाठी दुसऱ्या रंगाचा वापर करून कॅलिडोस्कोपिक प्रभाव साध्य केला जातो. 

पैठणी साड्यांचा इतिहास

पैठणी साड्यांचा इतिहास इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात सातवाहन राजवंशात सापडतो , त्यावेळी पैठणी शुद्ध सोन्याच्या तारेपासून कापूस आणि रेशमी कापडापासून बनवली जात असे. २००० वर्षांपूर्वी ग्रीको-रोमन लोकांना ही पैठणी साडी खूप आवडत असे. ते या आलिशान पैठणी साडीसाठी सोने वापरत असत. त्यावेळी ही पैठणी फक्त राजघराणीच घालत असत. पैठणीला "प्रतिष्ठानी" असेही म्हटले जात असे कारण ती प्राचीन प्रतिष्ठान शहरात उगम पावली होती ज्याला आता पैठण म्हणून ओळखले जाते. अनेक प्राचीन हिंदू आणि बौद्ध ग्रंथांमध्येही पैठणीच्या खुणा आढळतात. पैठणीला "देव वस्त्र" (देवाचे कापड) असेही म्हटले जाते. पैठणीचा २५०० वर्षांचा इतिहास खूप समृद्ध आहे परंतु तरीही आपल्यापैकी बरेच जण अनभिज्ञ आहेत. इतिहासकारांनी २०० ते ४०० ई.पू. दरम्यान ग्रीसमध्ये सोन्याच्या बदल्यात नाजूक सोने आणि चांदीच्या धाग्याच्या कामाच्या उत्तम पैठणी साड्या विकल्या जात असल्याचे नोंदवले आहे. १८ व्या शतकात पेशव्यांच्या आश्रयाने पैठणीची भरभराट झाली. असे मानले जाते की माधवराव पेशवे यांना पैठणीच्या कापडावर विशेष प्रेम होते. अशीही आख्यायिका आहे की हैदराबादच्या निजामालाही पैठणी आवडली आणि त्यांची सून निलोफरने सीमा आणि पल्लव डिझाइनमध्ये नवीन आकृतिबंध आणले.
      


एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने -चांदी, हिरे -माणिके यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे यांचे जर वापरुन तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. एक सहावारी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. साधारणपणे पाचशे ग्रॅम रेशीम धागे आणि अडीचशे ग्रॅम जर लागते. पैठणीचे वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, आदी रंगामध्येही तयार होऊ लागली.

पुढे यादव राजवंशाच्या काळातही पैठणीला विदेशात मागणी होती. मराठे, पेशवे यांच्या साम्राज्यात पैठणीला राजाश्रय मिळाला. राज घराण्यातील महिला याच साड्यांना पसंती देत. राजाश्रयाबरोबच नंतर तिला लोकाश्रय मिळू लागला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असणारी पैठणी सौभाग्याचे लेणे म्हणून मिरवू लागली. नववधूला ‘पैठणी’ या महावस्त्राने अलंकृत करुन तिची सासरी पाठवणी होऊ लागली. तिला पूजेत मान मिळाला. पंढरपूरच्या विठू माऊली, कोल्हापुरची अंबाबाई यांना खास पैठणी वस्त्र विणून सजवले जाऊ लागले. जर आणि रेशीम यांच्या एकेक धाग्यांच्या तानाबान्यातून, विविध फुले, पक्षी यांच्या आकृत्यांचे नक्षीकाम विणताना विणकर आपला जीव त्या कलाकुसरीत ओततो. ऐतिहासिक वैभव आणि भारतीय कला यांचा सुंदर मिलाफ पैठणीत दिसतो. पैठणी विणताना विणकरांनी अनेक पिढ्यांचे अनुभव आणि परिश्रम खर्ची घातले असतात
एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने -चांदी, हिरे -माणिके यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे यांचे जर वापरुन तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. एक सहावारी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. साधारणपणे पाचशे ग्रॅम रेशीम धागे आणि अडीचशे ग्रॅम जर लागते. पैठणीचे वैशिष्टय म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी, आदी रंगामध्येही तयार होऊ लागली.

           पैठणी- तरुणाईची फॅशन

  पैठणी म्हटलं की, साडी हे समीकरण आधुनिक काळात बदलले आहे. फॅशनच्या असंख्य क्षेत्रात पैठणीने शिरकाव केला असून तिची आंतरराष्ट्रीय झेप सुद्धा उंचावली आहे. २०००मध्ये ब्रिटिश एअरवेजने विमानाचा बाहेरील भाग पैठणीच्या नक्षीने सजवला होता. तसेच त्यांचे तिकीट, पेन, पेन्सिल, टी – शर्ट अशा वस्तूंवर पैठणीची नक्षी झळकली होती. आजकाल तरुण वर्गामध्ये पैठणीची फॅशन म्हणून प्रसिद्धी होत आहे. जसे कुर्ती, जाकीट, धोती, घागरा ओढणी, ब्लाऊज, वॉलपीस, पर्स, ट्रे, वनपीस, तोरण, आकाश कंदील अशा अनेक वस्तूंवर पैठणीचा ठसा उमटत आहे. अशा रितीने राखेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पैठणी पुन्हा नववैभव,नवचैतन्य प्राप्त करत आहे. त्यास गती देण्यासाठी व शुद्ध रेशीम व जर वापरून तयार होणाऱ्या ओरिजिनल पैठणीचा रुबाब वाढवण्यासाठी अधिक अधिक प्रयत्नांची गरज मात्र निश्चित आहे.

सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी ‘पैठणी’ या कवितेत त्यांच्या आजीच्या पैठणीचे वर्णन केले आहे. त्यातील काही ओळी …..

वर्षामागून वर्ष गेली

संसाराचा सराव झाला

नवा कोरा कडक पोत

एक मऊपणा ल्याला

पैठणीच्या घडी घडीतून

अवघे आयुष्य उलगडत गेले

अहेवपणी मरण आले

आजीच्या माझे सोने झाले….

अशी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे सोने करणारी, सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र पैठणी .


No comments:

Post a Comment

For the Indian monsoon season, hairstyles that are easy to manage and protect hair

https://www.fashionprotrends.in.net/  For the Indian monsoon season, hairstyles that are easy to manage and protect hair from humidity and f...